Sunday, July 17, 2011

"हर एक के सच के versions होते है"

"हर एक के सच के versions होते है" ! हि ओळ आहे नुकताच आलेल्या नव्या चित्रपट "जिंदगी मिलेगी न दुबारा" मधील .. जिंकाल ह्या ओळीने ! खरच प्रत्येकाला आयुष्यात जेव्हा खर बोलायची वेळ येते तेव्हा त्याचे खर बोलायचे वेगवेगळे versions तयार होतात, म्हणजे तो जे खर बोलत असतो ते त्यासाठी खर असत म्हंजे स्वतासाठी बनवलेलं खर आणि इतरांसाठी किवा इतर सगळ्यासाठी वेगवेगळे versions .. तस तो प्रसारित करतो.
गम्मत अशी असते कि त्या माणसाने त्याला चांगल वाटाव आणि त्याच्या साठी ते एकदम बरोबर ठराव आस एक खर बोलण्याच version तयार केलेलं असते त्यात तो पूर्ण पणे Hero असतो मग तो समोरच्या माणसाला किवा वेगवेगळ्या लोकांना त्याच एका "खरच्या" release च वेगवेगळे verions सांगायला सुरुवात करतो .. पण विचार करा न समजा हीच सगळी लोक जर एकत्र आली तर तेच "खर" एका नवीन version मध्ये बाहेर येत, ते त्या माणसाच खोट आणि त्या खऱ्याच अगदी खरे खरे version असत.
बर असो, "जिंदगी मिलेगी न दुबारा" ..एक छान चित्रपट वाटला, तरुणाईचा आवक असलेला , कुठे तरी "दिल चाहता हिची" आठवण करून देणारा पण बराच फरक असलेला अगदी आताच्या काळाप्रमाणे असलेला.
चित्रपट बऱ्या पैकी वेग आहे, कंटाला येत नाही, सगळ्यांची काम छान झालीत worth to watch ... माझ्या कडून ३ आणि १/२ *

Friday, July 8, 2011

मला सगळ आवरल्या शिवाय चैनेच पडत नाही

बेडा घाट वरून परत आल्यावर सगळ्यात मोठ काम माझ्या समोर होत ते म्हणजे सगळ्या bags आवरून सगळ समान जागच्या जागेवर ठेवणे ... मग काय रात्री जेव्हा मी पुण्यात पोहोचले खूप जास्त थकले होते .. सगळ तसाच ठेवून झोपून गेले आणि सकाळी उठल्यावर माझ काम चालू ...
माझा प्रोब्लेम असा आहे न कि मी कितीही थकलेले असले तरी मला सगळ आवरल्या शिवाय चैनेच पडत नाही ... सगळ्या bags उघडून सगळ्यात आधी मी धुण्याचे कपडे वेगळे केले तसे मी ते थिथूनच वेगळे करून आणले होते ... ते आधी वाशिंग मचिन ला लावले , जे जास्त मळले होते ते गरम पाण्यात भिजवले मग next जे कपडे dycleaning ला जाणार होते एका पिशवीत टाकले. मग बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे माझे cosmatices सगळे जागच्या गेवर ठेवले मग बाथरूम गोष्टी जागेवर गेल्या ..मग सगळे चप्पल आणि shoes पुसून, कागद मध्ये गुंडाळून जागेवर ठेवले ... पूर्ण bag रिकामी करून bagechya जागेवर ... जेव्हा माझी पूर्ण रूम पाहोल्या सारखी दिसू लागली तेव्हा माझ्या जीवात जीव आला ...
काही लोक मी पाहिलेत bags तश्याच ठेवून महिना भरही तसेच राहू शकतात .. मला खरच आश्चर्या वाटत ...

Thursday, June 30, 2011

शेवटी महाराष्ट्र ते महाराष्ट्र ..

कालच मी कान्हा वरून परत आलेय आधी मुंबईत आले आणि तिथून पुण्याला, हुस्श्या झाले मला एकदाच घरी आल्यावर ... शेवटी महाराष्ट्र ते महाराष्ट्र .. त्याला तोड नाही .. आणि पुण्याला तर नाहीच नाही ...
मी आत पर्यंत खूप राज्य बघितली ... पण महाराष्ट्र एवढी सुबत्ता आणि सुरक्षितता कुठेच नाहीये .. मी जेवढ सुरक्षित पुण्यात असते तेवढ मला दुसर कुठेही वाटत नाही आणि सत्य आहे ...
म प्र चांगल आहे .. त्यांनी जी add केलीये ती हि त्यातल काही प्रदेशाला match करते ..पण मला तिथे भयंकर गरिबी वाटली म्हणजे गरीबीच आहे तिथे .. एवढा मोठा पसरलेला भूखंड आणि त्यातून वाहणारी नर्मदा .. पण उपयोग काय लोकच नाह्येत तिथे सगळे पैसे कमवण्या साठी गेलेत बाहेर म्हणजे कोणी दिल्लीला तर कोणी मुंबईला अथवा कोणी पुण्याला ...
तिथे असणाऱ्या जमिनीचा आणि नर्मदेच्या पाण्याचा काही उपयोगच नाहीये ... खर सांगू का जर तिथल्या लोकांनी ठरवलं ना तर ठीथे सोन पण उगवेल पण कष्ट कोण करणार ?
साध उदाहरण सांगते ... तिथे बेडा घात म्हणून एक visitor spot आहे जिथे खूप हिंदी चित्रपटांच शूटिंग झाल आहे ... तिथे संगमरवरी दगडाची कलाकारी विकण्यासाठी आहे सात संगमरवरी हत्तीचा संच कितीला असेल ... फक्त ३५ रुपयांना ... विश्वास बसतोय म्हंजे तो संच पाहून कोणीही इथे त्याचे १५० - २०० रुपये सहज देतील ..
अजून एक सांगते .. माझ्या गाडीचा चालक जो मला जबलपूर ते कान्हा आणि कान्हा ते कान्हा ते जबलपूर नेणार होता त्याला फक्त ३,५०० हजार पगार होता आणि त्यात तो खुश होता ..
विश्वासच बसत नाही ...
पण जेव्हा मी कान्हा पाहिलं तेव्हा मी सगळ विसरून गेले .. सुंदर खूपच सुंदर असा जंगलच मी कधी पाहिलं नाही .. मला live national geograpghy channel पहिल्या सारख वाटत ..इतक शांत आणि घनदाट पसरलेलं जंगल ... अहाहा डोळे दिपले माझे ते निसर्गाचे रूप बघून, खरच ... निसर्ग एवढ सुंदर कोणीच नाही ...
मी लवकरच कान्हाचे चित्रफिती आणि माहिती इथे प्रसारित करेन

Wednesday, June 22, 2011

खूप वाईट वाटतंय ...

आज वारी देहू मध्ये आलेय .. आणि विठोबा तुकाराम गजरात वारकरी पंढरीची वाट चालू लागलेत ... काय सुंदर दृश्य असेल ते ... पण आज मी महाराष्ट्रात नाहीये ... खूप वाईट वाटतंय ..ह्या वर्षी वारीचे प्रत्येक क्षण कॅमेरा मध्ये टिपण्याची माझी इच्छा होती पण जी पूर्ण नाही होऊ शकली .. शेवटी काय आयुच्यात प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आस काही सांगता येत नाही ... पण पुढ्या वर्षी मात्र नक्कीच मी पूर्ण वारीला माझ्या कॅमेरा मध्ये टिपेन हे नक्की ...
मी मध्य प्रदेश मध्ये आहे आणि वारीच्या एवजी कान्हाच जंगले आणि त्यातील प्राणी कॅमेरात टिपणार आहे ... होपफुली मला वाघ दिसतील ... I am crossing my fingers !! lets see ..

मी नक्कीच कान्हाचे फोटो आणि वाघाचे फोटो प्रकाशित करेन माझ्या पुढच्या post मध्ये ...

Sunday, June 19, 2011

मिस यु आल .. !!!

आयुष्यात प्रत्येक जन काही तरी ध्येय घेवून पुढे जात असतात मी हि काही तरी ठरवून पुढे जातेय ... पण जेव्हा आपण काही तरी मिळवायचं ठरवतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील काहीतरी मागेन सोडून पुढे सरकत असतो ... कारण आस होऊच शकत नाही कि सगळ्या गोष्टी घेवून किवा सगळ्यांना खुश करून आयुष्यात पुढे जाता येत ... मग आता कुठे काय आणि कोणाला सोडायचं हे मात्र सर्वस्वी आपल्यालाच ठरावाव लागत ... त्या मध्ये मात्र आपली मदत करणार कोणीही नसत ...
मी हि हच विचार करून .. पुचे जातेय ... १५ तारखेला माझा ऑफिसचा शेवटचा दिवस होता .. साडे चार वर्षे ज्या कॉमापानी मध्ये मी काढली ती सोडताना ..मनाला काही तरी वेगळ वतन साहजिक होत .. आणि तेच मी अनुभवलं ... भयंकर द्विधा मानास्तीती मध्ये होते मी ... ते ऑफिस , ते सगळे लोक ज्यांच्या बरोबर मी इतक्या वर्षे काम केल ... ते ऑफिस मधाळ वातावरण आणि जे थोडे पण आयुष्य भर पुरणारे मित्र ... हे सोडताना जर वाईट वाटल नाही तर तो माणूस .. दगडी काळजाचा असेल असाच मी म्हणेल ...
दुपार पर्यंत स्वताला शांत ठेवून clearance काम केली .. पण जसे घड्याळ पुढे पुढे सरकत होते पायातले त्राण कमी कमी होत होते ... शेवटी एक वेळ असाही आली कि रडू कोसालेच .. मग मी पटकन ऑफिस मध्ये वाश रूम मध्ये गेले आणि स्वताला कंट्रोल मध्ये आणून बाहेर आले ..
रोज मी त्या सगळ्या गोशी मिस करते .. आता जो पर्यंत नवीन काम चालू होत नाही तो पर्यंत आणि नंतरही कादाचील ते सगळ आठवेल ... मिस यु आल .. !!!