Friday, February 17, 2012

माझ नवीन फोटोग्राफी पेज ...

माझ नवीन फोटोग्राफी पेज , कृपया खालील लिंक वर क्लीक करा आणि आवडलं तर नक्की पुढे शेअर करा -

http://www.facebook.com/pg0511


- तुमची प्रीती

Thursday, February 16, 2012

Please VOTE today ...



I voted ... YOU ??

Please Vote today ..if not then please dont complain about the system ..


Saturday, February 11, 2012

युवी...वि आर मिसिंग यु !!


युवी ..युवराज .. क्रिकेट वर राज करणारा तो युवराज .. भारताचा नायक .. क्रिकेट साठी लढणारा लाढविय्या एकदम अचानक पटागांतून दिसेनासा झाला .. आणि लढू लागला आयुष्याची लढाई ..
खूप वाईट वाटले जेव्हा युवीच्या आजार बद्दल कळले आणि एकदम आठवली ती जाहिरात "जब तक बल्ला है थाट है .. नही तो ?"
जेव्हा पाहिल्यांदा त्याच्या आजार बद्दल पपेर मध्ये कळले तेव्हा कुठे तरी पाल चुक्चुकून गेली कि नक्की काय आहे ..पण काही दिवसातच बातमी आली आणि मन अस्तीर झाल ..
मनुष्याच जीवन इतक नाजूक रेशमी धागा असतो का ? .. कि तो कधी हि विरू लागतो आणि आयुष्याची लढाई चालू करून देतो, हि गोष्ट कोणीच सांगू शकत नाही .. युवी ची बातमी कळल्यावर माझ्या डोळ्या समोर त्याचे सगळे चांगले दिवस एका मागून एक येवून गेले .. त्याची प्रेमप्रकरणे , त्याचे ते एकाच ओवर मधले ६ षटकार .. आणि त्याला मिळालेली वाह वाह .. त्याचे चित्रपट ताराकाबरोबराचे नाच .. त्याच्या सगळ्या जाहिराती आणि मग ... तो विश्व विजेता होण्याचा मान आणि जगलेल ते स्वप्न .. सगळ्यांचच ! जे पूर्ण करण्यामध्ये त्याचा फारच मोलाचा वाटा आहे. विश्वजेत्ते पद मिळाल्या नन्तर त्यांनी व्यक्त केलेला आनंद उत्सव ... शब्द नाहीयेत त्या गोष्टी सांगण्यासाठी .. आणि आपण सगळ्यांनीच ते पाहिलंय आणि अनुभवलाय !
काळ कसा एका शक्नात बदलतो आणि होत्याच नवत करतो .. युवीच्या सगळ्या जाहिराती आता कोणी तरी वेगळे लोक करत आहेत फक्त एकच जाहिरात अजूनही तशीच आहे एका बदला सह .. "जब तक बल्ला है थाट है .. नही तो , जिंदगी भी क्या रंग दिखती है .."
युवी लवकरच छान बर होऊन पटागांत परत येईल आणि त्याच्या त्याच कातील खेळातून पुन्हा आपल्या देशाच नाव पुढे आणील असाच मला मनापासून वाटत आणि मला वाटत असाच सगळ्यांना हि वाटत असेल ..
युवी वि मिस यु !!

Sunday, January 29, 2012

अहम अहम .. भेटा माझ्यातल्या लेखक आणि फोटोग्राफर ला .."महाराष्ट्र टाइम्स" मध्ये !!

मला सांगण्यात खुपच आनंद होतोय कि माझा एक लेख कवडीपाट आणि त्याचेच काही फोटो , २८ जानेवारी च्या "महाराष्ट्र टाइम्स" मध्ये छापून आलाय.
२८ जानेवारीच्या सकाळी ७:०० च्या दरम्यान मला आनंदाचा धक्का मिळाला जेव्हा मला मझ्या काही जवळच्या लोकांचा फोन आला आणि मला कळल कि माझा लेख आजच्या पेपर मध्ये छापून आलाय .. मी तडक उठले आणि पेपर पहिला ... छान वाटल स्वताच नाव एवढ्या मोठ्या पेपर मध्ये वाचून ... दिवसभर बऱ्याच लोकांनी फोन करून अभिनंदन केल त्याच अप्रूप काही वेगळच नाही का ?



टीप -पूर्ण लेख नीट वाचण्यासाठी , वरच्या फोटोवर क्लीक करा.
किवा फोटो दुसऱ्या विंडो मध्ये उघडा आणि झूम करा.

Friday, January 20, 2012

माझीच मी ...


परडी भरली होती फुलांनी
ओसंडून वाहिली होती चारहि दिशांनी
वाहून गेले माझीच मी ...
अश्रू वाहोनि थिजले गाली
विरघळून गेली ती कहाणी
अस्मिता जपली माझीच मी ...
चान्दण झेललं ह्या ओठी
सुख साठवलं ह्या पोटी
ओंजळीत लपली माझीच मी ...
चालत चालत चालले मी
पुन्हा नं मागे पाहिलं मी
ओळखीच्या वळणवर, ना
नदीच्या काठावर, ना
संध्येच्या सूर्य बरोबर
चालत चालली माझीच मी ...

Saturday, January 14, 2012

भाव साजिरे दे ना मला .....


मोर पीस जणू फिरून गेल

घाव सारे वाहोनि नेले

भाव सारे देवोनी गेल

आनंदाच्या गगनात

फुलाच्या वनात

मोर पिसारयत ये ना पुन्हा

भाव साजिरे दे ना मला .....

Wednesday, January 4, 2012

२०११ ... आयुष्यातील एक सगळ्यात मोठ पर्व ... जे शिकवून गेल बराच काही !!! अलविदा २०११ ...



मला वाटत ह्या जगातला प्रत्येक माणूस नवीन वर्ष चालू होताना एकदा तरी मागील वर्ष कस गेल ह्या बाबतीत नक्कीच विचार करत असेल आणि त्या एका सेकंदाच तो माणूस ते पूर्ण वर्ष फिरून येतो ,प्रत्येकाला स्वताचे चांगले वाईट दिवस दिसून जातात आणि त्यावरच लोक ठरवतात कि मगच वर्ष चांगल गेल कि खराब ..
वाट तशी ठरली होती कुठे जायचं ते हि पक्क होत आयुष्यात कधी दुख असू शकतच नाही हेच फक्त तेव्हा दिसत होत पण अचानकच वादळ आल आणि सगळ काही धुसर झाल आणि वाटच चुकली वाट अशी चुकली कि परत वाटेवर न आणता पूर्वीच्या वाटेवर सोडून गेली, तेव्हा कदाचित हे नवते माहित कि पूर्वीचीच वाट बरोबर होती ..
२०११ वर्षाची सुरुवातच वादळाने झाल्या मुळे पूर्ण वर्ष त्या वादळाच्या पाऊल खुणा काढण्यात गेल्या आस काहीस म्हणायला काहीच हरकत नाहीये, आयुष्यात जे काही कठीण प्रसंग येऊ शकतात ते सगळे हा म्हणजे तसे सगळेच जवळ जवळ येवून गेल्या सारखे वाटले. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांनाच आयुष्यात प्रोब्लेम्स असतात.. हो तर , असतात नं पण प्रत्येकाने आपला एक साचा बनवलेला असतो आणि त्याच्या बाहेर माणूस जास्त करून जाण्याचा प्रयत्न करत नसावा बहुतेक ..
तसाच साचा बनवलेला होता पण ह्या वेळेला साच्यात ठरवलेल्या गोष्टी आल्याच नाहीत, ज्यांच्या वर जास्त विश्वास होता ती लोक विश्वासाच्या चौकडीत बसलीच नाही तिथेच नापास झाली आणि स्वतच जग बानवण्यासाठी दुसऱ्याच बनवलेलं जग निर्दयी पणे तोडून निघून गेली. जीवनात भावना किती महत्त्वाच्या असतात आणि जेव्हा कोणी त्या तोडून मोडून लाथाडून निघून जात तेव्हा त्या इकडे तिकडे विखुरलेल्या भावना एकत्र गोळा करताना काय यातना होतात ते शब्दात सांगूनही कोणाला कळणार नाही. प्रत्येक भावना गोळा करताना मन किती जड होत हि गोष्ट अनुभवण्यासाठी त्याच अनुभवातून जाव लागेल. हे जग किती स्वार्थी असू शकत ते कळल्यावर आपला विश्वास कोणावरच बसू शकत नाही. प्रत्येक माणूस संशयी वाटू लागतो .. अगदी प्रत्येक !
त्यामुळे ह्या वर्षात हे कळल कि पटकन कोणावरही विश्वास ठेवू नये अगदी ती व्यक्ती आपल्या कितीही ओळखीची का होऊ नये, अगदी कितीही.. काही गोष्टी शेऐर करतान हजार काय १० हजार वेळा विचार करा.
आणि प्रत्येक वेळेला स्वताचा विचार करा आपल कस कश्या मुळे जास्त फायदा होईल ते बघा , जग स्वार्थी आहे तर आपण पण काय कमी स्वार्थी आहोत असा प्रश्नच पुढे कधी येतच कामा नये ... हि झाली भावनिक शिकवण जी २०११ वर्षां कडून मिळाली .
मग आली आर्थिक, कितीही छान गुंतवणूक आहे असे वाटल तरी स्वता कडचे सगळे पैसे संपवून त्याच्या मागे पळने मुर्खपणा असतो, पैसे संपतात आणि जेव्हा खरच पैश्याची गरज असते तेव्हा जमीन किवा घर आपल्याला लगेच काहीच पैसे देवू शकत नाही .. गुंतवून करा पण पैसे थोडे बाजूला ठेवून करा कारण जस मी वर सांगितलं, तस कोणीही कितीही जवळच असाल तरी पैश्याची गोष्ट आल्यावर सगळे तू कोण असेच हात वर करतात .. अगदी फालातुतल्या फालतू रकमे साठी सुद्धा ! आणि कधी काळी जरी तुम्ही त्या लोकांना मदत केली असेल तर तो परत आपलाच मुर्ख पणा ...
मग होत कॅरीअर् बद्दलचे झटके, नवीन ऑफिस मध्ये स्वताला सेट कारण हे मला वाटत सगळ्यात अवघड काम असेल आणि जेव्हा तुमच्या कुठल्याच गोष्टी निट होत नाहीयेत हे जेव्हा तुम्हाला माहित असत तेव्हा
बाकीच्या गोष्टीही नक्कीच खराब होतात कारण तुमच मन आणि डोक दोनीही जागेवर नसतात. त्यामुळे जेव्हा तुमच सगळाच पणाला लागल असेल कॅरिअर पणाला लावणे हा एक मोठा मुर्खपणा ठरेल ..
आता साधी आणि सोपी गोष्ट सगळ गणित बिनसल आणि एकदा का गाडी रुळावरून घसरली कि सगळा पडसाद उमटतो घरामध्ये आणि घरातल्या लोकांवर आणि चालू होतात घातरले प्रोब्लेम्स जे सुटत तर नाहीच उलट बिघडतच जातात आणि खर तिथे तुम्हाला गरज असते समजुतीची आणि कोणी तरी समजावून घेण्याची जर कोणी तस केल तरच घरामध्ये जास्त खचण्या आधी आपण वर येतो ...
त्यातच आयुष्यात हे हि शिकले कि तुमच्या कडे सगळ असेल पैसा, हुद्दा , ताकद, सौदर्य आणि व्यक्तीमतत्व पण 1 वेळ तुमला सगळ विसायला लावते अगदी सगळ .. जास्त अभिमान तुम्हाला घेवून बुडतो.
एकंदरीतच, आयुष्याच गणित जर एकदा चुकल तर ते बरोबर उत्तर द्यायला खुप वेळ लागतो आणि बरोबर घेवून जातो पैसा, काळजी, भावना , लोक , वेळ आणि वृत्ती ...
तेव्हा २०११ ने बराच काही हिरावून गेल पण शिकवून गेल लाख मोलाच्या गोष्टी ज्या आता पर्यंतच्या आयुष्यातही शिकल्या गेल्या नवत्या. जुनी लोक बोलतात कि नेहेमी आपल्यावर जेव्हा वाईट प्रसंग येतात ते आपल्याला काहीतरी धडा शिकवून जातात . आज कालची पिढी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसेल पण अश्या गोष्टींवर विश्वास बसण क्रमप्राप्त होत. २०११ वर्ष वाईट नवत ते होत नवीन धडे शिकवणारे वर्ष, जे धडे येणाऱ्या पुढील आयुष्यात नेहेमीच उपयोगी पडतील.
त्यातहि काही लोक सरप्राइस गिफ्ट पेंकेत मध्ये ह्या वर्षात आले आणि थोडा का होईना आपलेपणा आणि समजूतदार पण दाखवून गेले. आणि त्यामुळेच आलेल वादळ आणि त्यामुळे सापडलेली आधीची वाटच अगदी योग्य होती ह्याची पावती देवून गेले.

Tuesday, January 3, 2012

डॉन २


आज डॉन २ पाहिला , चित्रपटाला खुपच छान वेग आहे. आपण मनात काही विचार करण्याच्या आताच पुढची गोष्ट आपल्या समोर येते .. त्यामुळे चित्रपट पाहताना अजिबात कंटाळा येत नाही .. फरान ने खुपच छान कथानक जागवलय ..
चित्रपटाचा वेग आणि सगळे भारत बाहेरचे लोकेशन असल्या मुळे आपल्या कुठे तरी होलीवूड चित्रपट बघण्याचा भास होता आणि फरान ते आगदि ८० % जमल आहे .. ह्या चित्रपट मध्ये हि शेवट आपल्याला चक्रावून जातो जस डॉन १ मध्ये जातो.
बाकी सस्पेन्स छान घेतलाय .. चित्रपट गृहात जावून बघायला काहीच हरकत नाही. डॉन चे केस छान दिसतात नेहेमीच्या केसांपेक्षाही पण चेहेरा अर्रे बापरे त्यांनी आता वय झालेल्या लोकांचे रोल करावेत म्हणजे काका मामा वा वडील .., प्रियांका चोप्रा फारच साधी दिसलेय (gal next door) म्हंजे तशी ती काही छान नाहीच आहे पण मोठ्या पडद्या वर तरी ती चांगली दिसते ..पण डॉन २ ह्या साठी अपवाद ठरेल कारण बहुटेक तिच्या मेकउप कडे कोणी लक्ष्य दिलच नाहीये .. जास्त करून तीच नाक त्याला काहीच शेप च नाहीये मेकउप वाला बहुतेक विसरून गेला नाकाला रंगवायला ..
बर असो, सगळ्यात आचर्य मला वाटल ते म्हंजे प्रियांकाचा पोलीस मित्र अर्जुन .. म्हंजे छान वाटल मला त्याला त्या मोठ्या पडद्या वर पाहून कारण तो माझ्या गावाचा आहे .. लोक कशी छान पुढे जातात हे त्याच्या कडे पाहून कलात .. छोट्या गावातून एवढ्या मोठ्या पडद्यावर दिसन आणि ते हि एवढ्या मोठ्या लोकांबरोबर .. खरच hatsoff to him ... !!
त्यामुळे चित्रपत तुम्ही पाहू शकता , अजिबात कंटाळा येत नाही ... फक्त डॉन च प्रियांका वरच प्रेम थोड पटत नाही .. गोष्टीला रुचत नाही ..

Saturday, December 31, 2011

नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

Heyyyyyyyyy .. Glass of wine and Cocktails .... Chicken Chilly .. and old songs ... welcome 2012 !!!
Beautiful cold whether ... Awesome .. Happy new year !!

Thursday, December 15, 2011

सवाई गंधर्व भीमसेन उत्सवची झालेली माझी नवीन ओळख ...


सवाई गंधर्व भीमसेन उत्सव आणि माझा तसा काहीच संबंध नाहीये म्हणजे मला गान मला येत नाही आणि कळतही नाही , तस एक दोन वेळा मी सवाई ला गेले आहे पण ते असाच कोणाबरोबर तरी सोबत म्हणून गान ऐकायला नाही. पण ह्या वर्षी मात्र एक वेगळीच ओळख झाली माझी सवाई गंधर्व बरोबर ...
ते आस झाल कि मी नेहेमी प्रमाणे पित्ता मुळे आजारी पडले म्हणजे मला नेहेमीच हा त्रास होतो पण सध्या त्याच प्रमाण जरा जास्त चालू आहे . तर जास्त त्रास होत असल्याने मी फोन केला माझ्या फमिली डॉक्टर ना , त्याचं क्लिनिक १२:३० ला चालू होत म्हणून मी लगेचच नंबर लागावा ह्या हेतू ने फोन केला होता पण मला त्यांच्या रीसेप्शनिस्त कडून कळल कि ते त्या दिवशी लवकर येणार नाहीयेत कारण सवाई गंधर्व चालू आहे. मला वाटल अर्रे वाह डॉक्टरना गाण्याची आवड दिसतेय ..मग मी तिने सांगितल्या प्रमाणे २:३० ला दवाखान्यात गेले, पण तरीही डॉक्टर आले नवते मी म्हटलं अर्रे बापरे डॉक्टर एकदम जास्त दर्दी चाहते दिसतात सवाई चे आणि गाण्याचे . मी येवून बराच वेळ झाला, माझी त्यांच्याशी असलेली ओळख आणि माझा आजाराची तीव्रता बघून रीसेप्शनिस्त ने त्यांना फोन लावला तर ते सवाई मधेच होते पण मला कधी कधी सलाईन लावायला लागते म्हणून ते लगेचच आले.
सगळ तपासून झाल्यावर आणि औषध लिहून झाल्यावर मी त्यांना बोलले काय गान खुपच आवडत वाटत म्हणून दवाखान्याची वेळ हि ५ दिवांसाठी बदलली वाटत . माझ्याकडे न पाहताच त्यांनी मला ते सवाई चे त्रेस्त्री आहेत आस सांगितले मी एकदम त्यांच्या कडे दचकून पहिले आणि म्हटलं कस काय ? म्हणजे तुमचा दवाखाना इथेच आहे पहिल्या पासून म्हणून कि तुम्ही त्या बोडी वर आहात ? त्याने वर पहिले आणि अगदी शांत पणे म्हटले "अग मी सवाई गंधर्व ह्यांचा नातू आहे ते माझ्या आईचे वडील , त्यामुळे सगळे हक्क आमच्या कडे आहेत आणि म्हणूनच हे ५ दिवस पूर्ण लक्ष घालावाच लागत. सगळ्यात जास्त रसिकांना ह्या उत्सवाचा आनंद मिळावा म्हणून गेले कित्येक वर्ष आम्ही तिकिटांचे दर हि बदलेले नाहित, तू नाही वाटत जात ?? ".. मी डोळे मोठे करून हे सगळ ऐकत होते आणि मला काळातच नवत कि मी त्यांना काय विचारू कि काय बोलू .. मग मी थोड सावरून बोलले "नाही, मला कळत नाही गान .. पण पुढच्या वर्षी मात्र नक्की येईन .." ते बोलले "ये ये, समोरचा कोच आपण बुक करू जास्त महाग नाहीयेत त्याचेही दर .."
आस बोलून मी तिथून निघाले आणि विचार करू लागले ज्या लोकांकडे एवढी मोठी गोष्ट दाखवण्या सारखी आहे पण किती साधे पणे त्यांनी मला हे सांगितलं , अजून कोणी असत तर किती भाव मारला असता कि मी प्रत्यक्ष सवाई गंधर्व ह्यांचा नातू आहे . नाही तर ज्या लोकां कडे काहीही नसात ते हि उगाचच भाव मारून जातात .. मला वाटत ह्यालाच मनाचा मोठे पणा म्हणतात बहुतेक ..
काहीही असो , हे मात्र नक्की कि पुढच्या वर्षी सवाई गंधर्व भीमसेन उत्सवाचे छान फोटो मात्र नक्कीच काढायला मिळतील ...

Tuesday, December 13, 2011

न माझी मी राहिले , न माझी मी उरिले ......

तुझ्या डोळ्यात पहिले मी मला
न माझी मी राहिले ,न माझी मी उरिले

राहिले न माझे मी पण न थांबता विरघळून
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

सुंदर भासे सुंदर दिसे जगही आता
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

मन पक्षी पक्षी उडू लागले आकाशातून
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

गुंतले रेशमी बंध वाहिले चांदण्याचे गंध
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

तुझ्या डोळ्यात पहिले मी मला
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

Tuesday, December 6, 2011

डर्टी पिक्चर - उलाला उलाला .. !!!!

" जिंदगी एक बार मिलती तो दो बार क्यू सोचे ", "जवानी टेस्ट करने के लिये होती है वेस्ट करने के लिये नही" हि वाक्य आहेत डर्टी पिक्चर ह्या विद्या बालन च्या चर्चेत असलेल्या चित्रपटातील. सिल्क स्मिता ह्या साउथ च्या सेक्स बॉम् च्या जीवनावर आधारित चित्रपटात विद्या ने आपल्या दिखुलास आणि सगळाच खुलास अभिनयाने सगळ्यांना जिंकून घेतलं आहे.
परिणीता मधली विद्या आणि ह्या चित्रपटतील विद्या ह्या मध्ये जमीन असमांचा फरक तुम्हाला स्क्रीन वर बघायलअ नक्कीच मिळेल. चित्रपट छान घेतलाय , हळू हळू आपल्याला सिल्क चा तोलीवूड चा प्रवास कसा होता टे कळू लागत आणि चंदेरी दुनिया किती आतमधून पोखरलेली आहे ते हि कळत.
बाकी इंटरवल नंतर थोडा कंटाळवाना वाटला तरी मधेच चांगला वाटतो .. फक्त सुफियाना हे गान मात्र उगाचच काहीच गरज नसताना चित्रपट मध्ये घुसाडलाय हे मात्र सहन कराव लागत .. असो पण एकदारीतच चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही, चित्रपटाचे संवाद आपले पैसे वसूल करतात. विद्या आणि नसीर भाई चा अभिनय पाहून, ह्या वेळेचे सगळेच अवार्डस डर्टी पिक्चर ला असतील ह्यात काहीच वाद नाही.

माझ्या कडून ह्या चित्रपतासाठी ३ रेटींग ... उलाला उलाला .. गान मस्त हिट !!!!!!

Wednesday, November 30, 2011

पसाट .... wow simply woooow ...!!!


मला पहिल्या पासूनच गाड्यांच भयंकर आकर्षण आहे, कुठलीही नवीन गाडी बाजारात आली कि मला ती कधी एकदा पाहते आस नेहेमीच वाटत आणि बऱ्याच वेळेला मी गाड्यांचे स्पेसिफिकेशन पण अगदी आवर्जून पाहते . आमच्या दोन्ही गाड्या घेताना पण मी बराच विचार केला होता. माझी पहिली गाडी आम्हाला मोठी आणि आरामदायी हवी होती जी आम्ही बाहेरगावी जाताना वापरू म्हणून त्या वेळेला बाजारात इंनोवा गाडी जोरात चालू होती म्हणून मी इंनोवा ला प्रेफरन्स दिला. इंनोवा पण छान गाडी आहे एकदम मोठी, भव्य आणि आरामदायी आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे इंनोवाचा AC, सेकॅंदा मधेच गाडी पूर्ण गार होते. मग काही दिवसांनी मला रोजच्या कामासाठी आणि ऑफिस ला जाण्यासाठी वा गावात जाण्यासाठी इंनोवा खुपच मोठी वाटू लागली मग आम्ही इकॉनोमिकॅल गाडी घ्यायची ठरवली. इकॉनोमिकॅल गाडी म्हटल्यावर मारुती शिवाय मला नाही वाटत कुठल् दुसर नाव समोर येवू शकत. त्यावेलेलाही मी खूप गाड्या पहिल्या आणि सगळ्या मध्ये आवडली निसान ची मिअक्रा पण आधीच ठरवल्या प्रमाणे मला एक छोटी स्वस्त आणि नीट इकॉनोमिकॅल गाडी हवी होत म्हणून मी अल्टो k10 घेतली .. छान गाडी आहे. मग बरेच दिवस कुठली गाडी अशी पहिली नाही कि पुन्हा एकदा मान वळवून पहावी. आणि काही दिवसांनी एका गाडीची चर्चा बाजारात ऐकू येवू लागली ज्याच्या त्याच्या तोंडी एकाच नाव आणि त्या गाडीची स्तुती ... ती गाडी होती Volks Wagen – Pasaat ....
मी पसाटचे फिचर्स पाहून खुपच इम्प्रेस झाले आणि एक दिवस मला ती गाडी एका सिग्नल ला दिसली राखाडी कलर असलेली लांब रेखीव गाडी, ती जाई पर्यंत मी ती गाडी पाहत बसले मग काही दिवसातच पसाट रस्त्यावर दिसू लागली पण जेव्हाही दिसायची मी मागे वळून पाहायचेच
एक दिवस मी माझ्या काकूंकडे चालले होते शनिवार होता माझी गाडी मी रस्त्यावर सामन्तर पार्किंग मध्ये पार्क करत होते मग गाडीतून उतरून मी गाडीला लॉंक लावताना मला माझ्या गाडीच्या मागे पसाट पार्क होताना दिसली म्हटलं जाताना पाहाव तिच्या कडे तेवढ्यातच मला आवाज आला कि “मादाम, एवढ लॉंक नका करु, कोणी नाही चोरून नेणार गाडी ...” मी दचकून मागे पाहिलं तर माझा एक जुना मित्र चांगला मित्र बऱ्याच वर्षांनी माझ्या समोर पसाटमधून उतरत होता मग काय आमच्या गप्पा चालू झाल्या मधून मधून मी पसाटकडे पाहत होते तेवढ्यातच माझा मित्र मला बोलला आपण इथे उभ राहून बोलण्या पेक्षा होटेल मध्ये जाऊन कॉफी घेऊयात का ? मी म्हटलं चला ..., न राहवून मी त्याला बोलले मी चालवू का रे गाडी ?? पण त्याने उत्तर दिल ..पाहिलं तू पसाट काय आहे हा अनुभव बाजूला बसून घे आणि मग चालव .. मग काय गाडी चालू झाली आणि काय सांगू मी एवढी सही गाडी पहिलीच नाहीये कधीही its a computer ती गाडी एक रोबो आहे तिला मानुअल मोड वर चालवा व तिला ऑटो मोड वर .. जस्त लाजवाब ..मी मंत्रमुग्द्ध होवून गाडीच्या प्रत्येक फिचर्स पाहत होते, प्रत्येक सीईट साठी वेगळा AC आणि हिटर, सीईट हि आपल्या मणक्या च्या आकार प्रमाणे स्वतः सेट होते , हि अशी एकमेव गाडी आहे कि तिला बनवता हाडांचे डॉक्टरची मदत घेतली आहे , गाडी स्वतः स्वताला पार्क करते समोरच्या स्क्रीन वर पुढून मागून येणारे अडथळे दाखवते , हूड ऑटो मध्ये मागे घेता येते , मागच्या काचेला बटन ने गार्ड लावता येते, दरवाज्यांना बाजूला ओली छत्री ठेवली तरी ते पाणी बाहेर जाते अशी सोय दिलेय आणि अजूनही काही लहान साहन बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला बाकी दुसऱ्या गाड्यामध्ये बघायला नाही मिळणार .. आणि आराम वाह .. चालवता कळल हि नाही कि स्पीड १०० पर्यंत आहे एकदम स्मूथ .. wow simply woooow ...
मग काय पसाटअम्धून उतरू मस्त कॉफी आणि पूर्वीचे चे विषय .. कोण काय करतं आणि कोण कुठे आहे हे बोलता बोलता वेळ कसा गेला कळलाच नाही ..आणि ठरल्या प्रमाणे परत येताना मी पसाट चालावयाच मानसिक समाधान आणि स्वप्न जगवल ...
बाजारात ह्या बजेट मध्ये बहरपूर गाड्या आहेत मर्सिडीज आहे, BMW आहे, ऑडी हि ..पण पसाट ची गोष्ट वेगळी हे मात्र नक्की ...

Saturday, November 26, 2011

आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले ....


आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तोच चंद्र जो सगळ्यांना हवासा वाटतो
तोच चंद्र जो त्याच्या कवितेत असतो
तोच चंद्र जो तिच्या पुढे सुंदर नसतो
सुंदर असते ती, जी चंद्राला प्रश्न करते
खरच, आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तिचे हसणे पण चंद्राच्या त्या निखळ चांदण्यासारखे भासले
तिचे डोळे पण चन्द्रासारखे दिसले
नाही तर तिच्या डोळ्यात तरी चंद्र दिसला
आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
ती समोर दिसावी म्हणून चंद्र समोर दिसू लागला
आणि आता ती लाजली असेल आस वाटल कारण
चंद्र ढगात लपला ...

Tuesday, November 22, 2011

पोर्न स्टार सन्नी लीवओन ची बिग्ग बोस नावाच्या रिअलिटी शो मध्ये एन्ट्री ..खरच गरज आहे का ?




पोर्न स्टार सन्नी लीवओन ची बिग्ग बोस नावाच्या रिअलिटी शो मध्ये एन्ट्री .. हि बातमी वृत्तवाहिन्यावर झळकताच, आपले सगळे लोक खडबडून जागे झाली. सगळ्या वाहिन्यावर तेच तेच बातम्या आणि त्याच एका बातमीवर वाद विवाद चालू झाला !
कळत नकळत मी हि असंच बातमी पहिली आणि जास्त काही कळण्याच्या आताच मी दुसऱ्या चानेल चा नंबर दाबला पण लक्षात राहील फक्त नाव सन्नी लीवओन ...एक पोर्न स्टार
दुसऱ्या दिवशी पेपर वाचून झाल्यावर माझ्या ते नाव एकदमच माझ्या डोक्यात आल मग मी विचार केला पोर्न स्टार म्हणजे नक्कीच हे सगळ नग्नता आणि अश्लीलता असलेले मॉडेल बद्दल असेल म्हणूनच एवढा आरडा ओरडा सगळ्या वृत्तवाहिन्या वर चालू होता. कधीही न पाहिलेला चेहेरा आणि कधीही न ऐकलेलं नाव कोणाच आहे हे पाहण्यासाठी मी गुगल केल आणि मला घाम फुटला जे काही माझ्या समोर आल ते पाहून ... त्या सगळ्या होत्या पोर्नोग्राफी च्या साईटस आणि हि सन्नी आहे त्या साईटसची स्टार ...
आणि ह्या एवढ्या मोठ्या रिअलिटी शो मध्ये हिला बोलावलंय .. का ? कश्या साठी ? असे भरपूर प्रश्न माझ्या समोर आले .. उत्तर फारच सोप आहे ह्या वाहिन्यांना हवा आहे पैसा आणि यश, प्रसिद्धी .. TRP वाढवण्यासाठी काय वाटेल ते करतील हि लोक उद्या काय वाटेल ते दाखवतील, स्वताच्या स्वार्थासाठी हे लोक हे का नाही विचार करत कि आपण जे काय दाखवतोय ते एका नेशनल वाहिनी वर दाखवतोय आणि हे सगळ फक्त १८+ लोक नाही तर सगळे पाहत आहे, अगदी लहान मुल हि ...
आता हेच उदाहरण घ्या ना मला हे नाव माहित नवत तिचा चेहेरा माहित नवता म्हणून मी गुगल केल माझ्या प्रमाणे भरपूर लोक असतील जे असच करतील आणि सोडूनही देतील पण जर नुकत्याच वयात आलेली कोणीही मुल आणि मुलीने हेच केल आणि त्यांना कळाल कि हि कोण आहे तर त्यांच्याच सामान्य ज्ञानमध्ये नको त्या गोष्टीची भर नाही का पडणार आणि गरज नसताना आणि वयही नसताना ..
आपलीच लोक पैश्यासाठी अश्या गोष्टी समोर आणून माहित नसलेल्या आणि नको असलेल्या लोकांना प्रसिद्धी मीळवून देतात ह्याच गोष्टीच मला नवल वाटत .. आज कोणालाही माहित नसलेली हि मुलगी अचानकच समोर आली आणि फेमस हि झाली .. सगळ कश्या साठी TRP आणि पैश्यासाठी ... आणि काय तर तिला हिंदी चित्रपट साठी पण ऑफर मिळतेय खरच कहर आहे निर्लजतेचा !!

Monday, November 14, 2011

देवूळ ... छान मार्केटिंग चित्रपट ..




जेव्हा मी देवूळच पोस्टर पहिल्यांदा पाहिलं तेव्हा नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर ह्या दोघांची जोडी पहिल्यांदाच एका छान चित्रपटात काम करतेय हे पाहून मस्त वाटल. त्यांच्या वृत्तवाहिन्यावर येणारे इंटरवीएव्स पाहून वाटल चला एक छान चित्रपट बर्याच दिवसांनी येतोय मस्त बघू सिनेमा गृहात जावूनच ...
कुलकर्णी'स चा असलेला हा दुसरा चित्रपट म्हणजे "वळू" नंतरचा .. तीच टीम फक्त बदल आसा कि एक कुलकर्णी गायब म्हणजे अतुल कुलकर्णी च्या जागी नाना पाटेकर बस ! बाकी तेच गाव, तेच डोंगर , तीच घर ,तीच मानस सगळ तेच .. असो पण गोष्ट तर वेगळी आहे ना ?
असं म्हणत गेले चित्रपट पाहायला ... लोकांची तशी गर्दी होती म्हणजे होऊस्फुलाच होता जवळ जवळ ... छान वाटल पाहून कि मराठी प्रेक्षक हल्ली सिनेमे चित्रपट गृहातच येवून पाहतात ..
चित्रपट चालू झाला आणि हळू हळू कळायला लागले कि आरे नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर हे च खरे तर मार्केटिंग चे हत्यार आहे .. म्हंजे चित्रपटाचा विषय अतिशय छान आहे आणि तो दाखवलाय पण छान, छोटे छोटे बारकावे पण दिग्दर्शकाने व्यवस्तीत पाने पार पाडलेत .. विषय कुठेही कंटाळवाणा त्याने होऊ दिला नाहीये म्हणजे थोडक्यात विषयाला छान जगवालाय हा चित्रपट ..
एक छोट खेड तेच जे वळू मध्ये होत ते, एका गुराख्याला म्हणजे हा गुराखीच पूर्ण चित्रपटाचा नायक आहे , हा तर त्याला एका भर दुपारी एका उंबराच्या खाली झोपलेला असताना साक्षत्कार होतो कि त्याला दत्त दिसले ! बस मग काय हि बातमी पूर्ण गावात पसरते सगळे हळू हळू तिथे येवून दर्शन घेवू लागतात त्यात गावातले काही मोठे लोक म्हणजे राजकारणी लोक त्याच बातमीचा फायदा घेवून राजकारण सुरु करतात आणि सगळी पोवर वापरून अनादित्रीत्या त्या जागी एक देवूळ बांधतात, ज्या गावामध्ये खरतर एका सरकारी इस्पितळाची गरज असते तिथे उभ राहत एक मंदिर एक देवूळ आणि तेच देवूळ मिळवून देत तिथल्या लोकांना पोट आणि खिसा भरण्याचे साधन ... जी लोक राजकारण खेळूनच त्या गावासाठी वीज, पाणी, रस्ते करू शकलेले नसतात तीच देवूळ झाल्याने सगळ काही करून देतात कारण त्यांना त्याचा मागे मिळत असतो पैसा ... अमाप पैसा !!
पुढे गावच गावपण हिरावल जात .. जो तो पैश्याच्या मागे पळताना दिसतो आणि ज्या दत्ता मुळे हे सगळ मिळाल असत त्यालाच विसरून जातो ..
पण ज्याला ह्या सगळ्या गोष्टीचा साक्षत्कार झालेला असतो तो काश्या समजू लागतो खरी परीस्तीती ..आणि तो एक दिवस देवालाच चोरतो आणि घेवून जातो गावापासून खूप लांब आणि बिचाऱ्याला वाटते चला देव गेला तर गाव पूर्वी सारख छान होईल पण तसं काही घडत नाही .. आणि मग हा चित्रपट संपतो ..हो म्हणजे खरच संपतो
आता तुम्ही बोलाल ह्यात नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर आहेत कुठे ? तेच तर ते खरच, आहेत कुठे ? नाना पाटेकर तरी आपल्याला थोडा दिसतो राजकारणात गावाचा पाटील म्हणून आणि थोडासा चित्रपट नानाच्या वाटेला आला आहे पण दिलीप प्रभावळकर तर फक्त गावाच्या पाटला कडे गावामध्ये होणारे इस्पितळ ची इमारत कशी असेल आणि हा पूर्ण प्रोजेक्ट कसा काम करेल फक्त हेच सांगतो तेही फक्त अर्ध्या चित्रपटात नन्तर तोही निघून जातो म्हणजे मी तर हा चित्रपात बनवला आसता तर कदाचित दिलीप प्रभावळकर ला पाहुणा कलाकार म्हनून संबोधल असत ..पण इथेच आल मार्केटिंग नाना- प्रभावळकर च्या जोडीला पुढे करून हा चित्रपट खूप गर्दी खेचतोय हेच तुम्हाला पाहायला मिळेल पण जर तुम्ही खास नाना व प्रभावळकर चा अभिनय पहायचा अस काहीस मनात ठेवून हा चित्रपट बघायला गेलात तर मात्र तुमच्या पदरी निराशा अपेक्षित आहे ..
केवळ मार्केटिंग हेच हत्यार वापरलाय ह्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ... जेवढा खर्च चित्रपट बनवण्यासाठी केलाय तेव्हढाच मार्केटिंग साठी ... "दुनिया झुकती ही झुकाने वाला चाहिये" हे मात्र खर ठरत खास देवूळच्या बाबतीत ..असो एकंदरीत मराठी चित्रपट सुद्धा आता हिंदी वाल्यासारखे आपल्या चित्रपटाचे मार्केटिंग खास करून गर्दी खेचू शकतात हे तितकाच खर !!!

Wednesday, November 2, 2011

प्रवास आवडीचा ...

आज मे उप्पर आसमा नीचे, आज मे आगे जमाना हे पीछे …

आज रस्ता तोच होता, तीच तीच गाव मागे मागे जात होती, वातावरणही तेच होते, छान दुपार उन्हात न्हाली होती, वारा मस्त सुसाट घाटातून वाहत होता, शेजारून छान मुळशी धरणाचे पाणी हळूहळू मागे सरत होते ..
रस्त्यात त्याच टपऱ्या, चहाची दुकाने आणि हॉटेल्स ..नेहेमीची गर्दी, नेहेमीच्याच स्पोटला लोकांच्या गाड्या उभ्या होत्या, कोणी फोटो काढताय तर कोणी मस्त झाडाच्या खाली बसून जेवणाचा आनंद घेत आहेत ..
वाह ... वाह!! मोठा वीकेंड त्यामुळे ताम्हीनीही घाटही व्यवस्तीत गाड्यांच्या गर्दिनी फुललेला दिसत होता. बऱ्याच ठिकाणी थांबायचा मोह मला झाला पण आजचा प्रवास वेगळा होता नेहेमीसारखा न्हवता, मला लवकरात लवकर माझ गाव गाठणे आवश्यक होत .. आणि नेहेमी प्रमाणे माझ डोक हि दुखत नवत आणि घरी जाऊन दुखणार पण नवत कारण ह्या वेळेला एकाच मोठा फरक होता माझ्या प्रवासामध्ये आणि तो म्हणजे मी स्वत इंनोवाच्या कारच्या ड्रायवर सीटवर बसले होते तसं इंनोवाला कार नाही म्हणता येणार इंनोवा म्हणजे एक मिनी ट्रक आहे ..
एकेकाळी मला अशक्य वाटणारी गोष्ट कि मी कधी इंनोवा सारखी मोठी गाडी घेवून ३ तासाचा घाट असलेला रस्ता पूर्ण पुण्यापासून कधी चालवू शकेन … पण शेवटी अशक्य काही नसत आणि मला तर वाटत कि ज्या गाड्या जास्त मोठ्या दिसतात त्या चालवायला तेवढ्याच सोप्या असतात .. रोज पुण्यात छोटी कार चालवून जेवढा आत्मविश्वास वाढला होता त्यापेक्षाही ह्या प्रवासाने मला एक नवीन भरारी मिळाली.
असो , पण हा माझा पहिला स्वत केलेला प्रवास खूपच अविस्मरणीय राहील ह्यात काहीच शंका नाही .. पण ह्या पुढे मी जगातली कुठलीही गाडी कुठेही चालवू शकते हे मात्र नक्की ...