Monday, January 2, 2017

सोफिस्टिकेशन !!

मित्रो !! ... SS   .. असा आवाज हल्ली लोकांच्या हृदयात खूपच घर करून गेलाय .. तर मित्रो  ..तुम्हाला सगळ्यांना नववर्षयाच्या हार्दिक शुभेचछा !! ह्या वर्षी महिन्यातून एक तरी कमीत कमी पोस्ट मी कारेन असा ठरवलंय .. बघू मी किती स्वतःच आवाज ऐकतेय ..
बऱ्याच दिवस पासून लिहीन म्हणून बोलत होते पण राहत होत .. खूप दिवसापासून मनात काही गोष्टी घोळ घालत होत्या पण मलाच काळत नाही कसं ते शब्दात मांडता येईल .. असा कि वाचून ते पटलं पाहिजे  आणि वाचणाऱ्याला राग हि नाही आला पाहिजे

Wednesday, July 13, 2016

हीच ती वेळ ...

हाच तो दिवस, हीच ती वेळ असा करता करता आपण पुढे जात असतो
पुढे जात असतो की स्वतःला ढकलत असतो समाधान जातो की आसमाधानाने .. कदाचित समाधानाने जात नाही म्हणून पुढचा येणार दिवस सुरू पण तसाच करतो.

काही लोक म्हणातात मला असाच जगायचंय .. कोण काय बोलताय ह्याच मला काही घेणं देणं नाही ..लोक वेडे असतात काहीही अपेक्षा ठेवतात की मी कसं जगायचं कसं बोलायचं .. माझं मी बघेन 

खूप लोक बोलतात सकाळ किंवा दिवसाची सुरुवात छान झाली तर दिवस चांगला जातो .. पण लोक हे विसरतात .. दिवसात अनेक लोक आपल्याला कामानिमित्ताने भेटतात आणि त्यांची सुरुवात छान झालेलीच असते असा काही नसत .. त्यांचंही आपल्यावर परिणाम होतो ..

खरं तर प्रत्येक बिंदू वेळेचा, जगावं आसा असला पाहिजे .. किंवा तो जगता आला पाहिजे .. माहीत नाही कधी असा जमेल .. जेव्हा जमेल सगळे सुखी होतील. पण हे ह्या सगळ्याच उत्तर नाहीये .. 

एक पुस्तक वाचतेय सध्या.. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जो विचार करता तसं घडत .. तुम्हची गोष्टी तुमच्या जीवनातल्या आकर्षित करता .. जर तुमही सगळं छान हवाय तुम्ही फक्त छान आणि चांगले विचार कारण आवश्यक आहे .. आणि खरं तेच खूप अवघड आहे 

एक माझे काका आहेत ते नेहेमी हे बोलत असतात हीच ती वेळ चला .. कुठल्याही गोष्टी साठी जर ती छोटी असेल किंवा मोठी, काही करण्या आधी "हीच ती वेळ " ..
मला कधी कधी ते ऐकून वाटत बहुतेक असाच असेल जेव्हा काही घडत असेल किंवा घडायचं असेल एक वेळ त्याला असेलच ना ..? 

Thursday, March 24, 2016

मन एक अजीब रसायन आहे ..

आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो. फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसत. सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी, आत्मकेंद्रीत असेल, तर ती कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते. तेच, व्यक्तीच्या स्वभावात गोडवा, विनयशीलता आणि शालीनता असेल तर, त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ते हवहवसं वाटतं. सहवासातील माणसाचं देखील तसच असतं. एखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने दिपून जाणं हा काही क्षणांचा खेळ असतो; पण जरी ती व्यक्ती सुंदर नसली आणि आकर्षक नसली पण तिच्या बोलण्यात जर गोडवा असेल जर ती समोरच्या माणसाला समजावून घेत असेल तर ती अधिक आकर्षक दिसू लागते ..
आयुष्यातही अनेक लोक येतात आणि जातात. काही जण तुम्हाला दिपवून टाकतात. तर, काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात. काही लोक तुम्हा तुमच्यातला लपलेला योदधा दाखवून देतात आणि कमाल घडवून आणतात .. आणि काही लोक तोच योदधा दाबण्याचा पर्यंत करतात. आपण जर एखाद्याच मोरल वाढवू शकलो तर ते एक असाधारण काम असत कारण त्याने ती व्यक्ती असा काही करून जाते कि तीच आयुष्य बदलून जाते ... पण फारच थोडी लोक हि गोष्ट लक्ष्यात ठेवतात. कि कोणीतरी आपल्या वाईट वेळेत साथ दिलीय बरसचे लोक हे सगळ विसरून जातात आणि आपल्या जीवनात रमून मोकळे होतात. जगात कुठलीच गोष्ट शाश्वत, निरंतर नसते, पण सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं . सात्विक प्रेमाची वाख्या कारण जरा अवघड आहे . कुठे तरी वाचल होत कि कितीही उजेड असेल सगळी कडे किवां खूप दिवे घरी लावले असतील पण जे समाधान एक छोट निरंजन लावून मिळत त्याच्या नाजुकश्या ज्योतीने जो प्रकाश मिळतो कदाचित ते मोठ्या दिव्याने पण मिळत नाही. कदाचित सात्विक प्रेम हि असंच असेल ..
नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच . आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरवात करता त्याला नजर लागायला वेळ लागत नाही. काही वेळा गोष्टी मनाप्रमाणे नाही घडत आहेत असा दिसू लागत तेव्हा स्वभाव आणि परिस्तिति गोष्टी पण्यात पाहू लागतात. त्यांचा ताळमेळ घालायचा प्रयन्त करू पाहतात. तो जर बसला तर गोष्टी नीट होयला वेळ लागत नाही पण नाही बसला कि त्या खूप बिघडायला हि पण वेळ लागत नाही.
माणूस पण खूप वेगवेगळ्या गोष्टी वेळेप्रमाणे करत असतो. त्याच्या चांगल्या वेळेत तो सगळ छान होईल तस समोरच्या माणसाला समजावून घेतो. त्याला त्रास होऊ लागला कि तोच त्रास नात्यामध्ये दिसू लागतो. आपण झाड लावतो, ते वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतो पाणी घालतो, त्याची निगा ठेवतो, खत घालतो, झाड मोठ होऊ लागत बहरू लागत फुल फळांनी लगडू लागत, पण आपल्याला वाटत आता आपल काम संपल आत त्याची निगा राखण्याची गरज संपली पण तसं नसत , त्या झाडासाठी दिलेला वेळ आता पुन्हा द्यायची गरज नाही असा जेव्हा वाटत तेव्हाच खर चुकत, झाड काही वेळाने फुल देण बंद करत , पण माणसाला वाटत हे झाड असा का बर फुल फळच देत नाही. तो त्याकडे अजून दुर्लश्य करू लागतो , झाड अजून खराब होऊ लागत. बहुतेक नात्याचं पण असंच असाव ... खरच मन एक अजीब रसायन आहे.

Wednesday, March 16, 2016

रेघ

रुसून ओढली एकदा दोन मनामध्ये
पुसली तरी ओरखडा देवून गेली ..
आधीच्या खोल भावनाना प्रश्न पुसून गेली
गोंधलेल्या मनात अजून गोंधळ देवून गेली ..
आज वरच्या प्रेमाला नजर लावून गेली
आणि जुन्या वेळेवर धूळ पसरवून गेली..

Saturday, January 9, 2016

खफा

हम खफा किससे रहे यहा तो अपने हि पराये हो गये ...
दामनने साथ छोडा हि था अब तो परछायी रुथ गयी ...
कच्ती दरियामे दूर गयी , हुमे तो न किनारा नसीब हुवा न दरिया का पाणी ....
वो प्यार करणा हमसे सिखे और बदलेमे बेवफाई दे गये ....