Showing posts with label Life. Show all posts
Showing posts with label Life. Show all posts

Wednesday, July 13, 2016

हीच ती वेळ ...

हाच तो दिवस, हीच ती वेळ असा करता करता आपण पुढे जात असतो
पुढे जात असतो की स्वतःला ढकलत असतो समाधान जातो की आसमाधानाने .. कदाचित समाधानाने जात नाही म्हणून पुढचा येणार दिवस सुरू पण तसाच करतो.

काही लोक म्हणातात मला असाच जगायचंय .. कोण काय बोलताय ह्याच मला काही घेणं देणं नाही ..लोक वेडे असतात काहीही अपेक्षा ठेवतात की मी कसं जगायचं कसं बोलायचं .. माझं मी बघेन 

खूप लोक बोलतात सकाळ किंवा दिवसाची सुरुवात छान झाली तर दिवस चांगला जातो .. पण लोक हे विसरतात .. दिवसात अनेक लोक आपल्याला कामानिमित्ताने भेटतात आणि त्यांची सुरुवात छान झालेलीच असते असा काही नसत .. त्यांचंही आपल्यावर परिणाम होतो ..

खरं तर प्रत्येक बिंदू वेळेचा, जगावं आसा असला पाहिजे .. किंवा तो जगता आला पाहिजे .. माहीत नाही कधी असा जमेल .. जेव्हा जमेल सगळे सुखी होतील. पण हे ह्या सगळ्याच उत्तर नाहीये .. 

एक पुस्तक वाचतेय सध्या.. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जो विचार करता तसं घडत .. तुम्हची गोष्टी तुमच्या जीवनातल्या आकर्षित करता .. जर तुमही सगळं छान हवाय तुम्ही फक्त छान आणि चांगले विचार कारण आवश्यक आहे .. आणि खरं तेच खूप अवघड आहे 

एक माझे काका आहेत ते नेहेमी हे बोलत असतात हीच ती वेळ चला .. कुठल्याही गोष्टी साठी जर ती छोटी असेल किंवा मोठी, काही करण्या आधी "हीच ती वेळ " ..
मला कधी कधी ते ऐकून वाटत बहुतेक असाच असेल जेव्हा काही घडत असेल किंवा घडायचं असेल एक वेळ त्याला असेलच ना ..? 

Friday, June 21, 2013

माझ ..नवीन .. घर .. आणि ..शिफ्टींग ...

नवीन घरात शिफ्ट होवून एक महिना झाला तरी अजून घर सेट करण काही थांबलेलं नाही. मी तर ह्या मताला आलेलं आहे कि मराठीत एक म्हण आहे "घर पहाव बांधून" तस "घर पहाव शिफ्ट करून" हे हि तेवढंच अवघड आहे. करण इथे दोन गोष्टी कराव्या लागतात पाहिलं म्हणजे आधीच्या घरातून आपल्याला हवेत त्या सगळ्या गोष्टी आवरून एकत्र भरायच्या मग त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नवीन ठिकाणी जावून बाहेर काढायच्या आणि लावायच्या. अर्रे राम किती ते काय काय कराव लागत .. आता तुम्ही बोलाल कि पेकेर्स अंड मुवेर्स का नाही वापरल इतक सोप आहे शिफ्ट करण .. पण ते लोक फक्त आपण काढून ठेवलेल्या गोष्टी पेक करतात आणि नवीन ठिकाणी जावून अनपेक करतात पण त्यांना आपणच सगळ काढून द्याव लागत .. हा मोठय गोष्टी जस TV ,, फ्रीज ह्या गोष्टी ठीक आहेत ते स्वताच नित पेक करतात. असो तर अश्या प्रकारे मी जुन्या घरातून नवीन घरी शिफ्ट झाले म्हणजे मुवेर्स ने आणल सगळ समान पण आणल्या नंतर लावण आहेच ना .. विचारू नका जवळ जवळ ५ दिवस मी तेच करत होते पहिला हॉल मग किचेन आणि मग शेवटी बेडरूमस .. किचेन मध्ये सगळ लावण तस फास्ट झाल करण तश्या प्रत्येक गोष्टी साठी सोयी करून ठेवलेल्या होत्या ..त्या मानाने हॉल पण लगेच लागला पण वेळ गेला तो बेडरूम्स मध्ये...करण घरातल तेच एक ठिकाण असत जिथे आपण सगळ्यात जास्त वेळ काढतो मग त्यचे माचींग पडदे त्याचा अम्बिअन्स चांगलाच हवा नाही का ?सकाळ पासून मी कामाला लागायचे कालाय्चाच नाही कधी वेळ गेला ते .. रोज एक लिस्ट बनवायचे आज काय हे आणायचं ..ते आणून झाल कि दुसर्या दिवशी अजून एक दुसरी लिस्ट तयार ह्यायाची ..घरातलं आवरून बाहेरच शोप्पिंग बापरे दम निघाला सगळा त्यात मे चा भयानक गरमा .. पण एवढ सगळ करून जे घर आपलं छान दिसत ते अप्रूप वेगळाच असत ............................................................................. आता घर नित लागलाय तरी मध्ये च काही तरी असत कि अर्रे हे आणायचं राहिलंय ..लिस्ट काय अजून संपत नाहीये :) पण वर्थ आहे हे करणआणि आपल घर लावण ह्यात जो आनंद मिळतो तो कशातच नाही ..नाही का ? ................................................................................................................. आता ह्या घरातील एक जागा हि आता माझी फार लाडकी झालेय माझ्या बेड रूम मधली खिडकी .. जिथे बाजूला सोन चाफ्याच्या फुलांनी बहरलेल झाड आहे हल्ली माझी सकाळ चहा बरोबर तिथेच होते .. हेच काय आताही मी तिथेच बसून हे सगळ लिहितेय ..

Thursday, March 14, 2013

जागतिक महिला दिन ???

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिन निमित्ताने काही गोष्टी तुमच्याशी शेएर करावयाच्या वाटल्या ...आपण जागतिक महिला दिन का सेलेब्रेट करतो ? हा जागतिक महिला दिन कश्या साठी बनवला गेला ? ................................................................................................................................. हा काही गोष्टी बंद होण्यासाठी बनवला गेला त्या स्त्री साठी जाचक होत्या, त्याचा भविष्यकाळ सुखद असावा, त्यांना इतर सगळ्या प्रमाणे सगळ्या सुविधा मिळाव्यात , त्यांना त्याच डिसिजन स्वत घेता याव आणि सगळ्यात महत्त्वाच त्यांच्या वर होणारा अन्याय आणि मारझोड बंद ह्वावी आणि स्त्रीला पण सगळ्या मध्ये आदर मिळावा. ................................................................................................................................. पण आस आजही मला वाटत नाही कि हे सगळ तिला मिलालय .... नाही भारतामध्ये अजूनही ला बर्याच गोष्टीना वंचित रहाव लागतंय ... काही भाग सोडले तर बाकी सगळीकडे तिच्या पदरी निराशाच आहे ... ................................................................................................................................ मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय लोक कुठेच गणली जात नाहीत त्याच प्रमाणे महिला दिन त्यांना काहीसा आपला वाटत नसावा कारण त्यातल्या त्यातच हा वर्ग व्यवस्तीत सुधारलेला आहे आणि इथली स्त्री स्वताच्या पायावर उभी राहून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करते इथे उलट जागतिक पुरुष दिन करायची गरज कदाचित भासेल ... ................................................................................................................................... पण बाकी सगळ्या वर्गांमध्ये हि असमानता दिसून येते आणि असते हि ... बर्याच स्तर मध्ये स्त्री ला देण्यात येणारा आदर कमी पडतो आणि खरी त्रुटी इथेच आहे. जोपर्यंत सगळ्या स्तरांवर स्त्री ला आदर मिळाला तरच हि मारझोड, होणारा अन्याय आणि शारीरिक शोषण बंद होणार आहे ... आता आदर म्हणजे नक्की कसा द्यायचा .. आता लोकांना सांगून तो काही लगेच येणार नाही पण आपल्या नवीन जनरेशन जर हे सारख सारख सांगितलं ..त्यांना स्त्रीत्व किती महान आहे हे समजून आपण सांगू शकलो तर नक्कीच पुढे येणारा काळ प्रत्येक स्त्री साठी सुकर असेल. लहान मुलांच्या शाळेच्या अभ्यास मध्ये दर वर्षी जर कुठल्याही महान स्त्री ची कथा अभ्यासक्रमा मध्ये टाकली तर लहान पण पासूनच स्त्री बद्दल चांगल मत बनण्यास मदत होईल आस नाही का वाटत तुम्हाला ? ................................................................................................................................... भारतातल्या बर्याच भागांमध्ये स्त्री हि एक भोग वस्तू म्हणूनच बघितली जाते , तिला चूल मुल आणि संसार ह्याच्या व्यतिरिक्त तिला इतर काहीही जीवनात अस्तित्व नाही. आस का विचारल्यावर पुन्हा तीच त्रुटी दिसून येते कि स्त्रीत्व चा आदर नसणे .. ................................................................................................................................... आताच झालेलि दिल्लीची निर्भया केस आपण सगळ्यांनीच ऐकली .वाचली .. काय चूक होती तिची ? एवढीच कि ती दिल्लीमध्ये थोड उशिर झाल्यामुले घाईने चुकीच्या बस मध्ये बसली आणि इतका भयंकर क्रूर कृत्य घडल. तिच्या वर बलात्कार करणाऱ्या प्रत्येक माणसाला आई असेलच ना ? पण इथेच स्त्री बद्दलचा आदर कमी पडला आणि ती एक भोग वस्तू आहे हे त्यांनी पाहिलं .................................................................................................................................. सगळी कडे फिरून शेवटी हेच मत येत कि मुलांना स्त्री चा आदर करता येवू लागला पाहिजे नाही तर अजून परिस्तिति गंभीर होण्यासाठी वेळ लागणार नाही. हि परिस्तिति फक्त ह्याच एका गोष्टीने सुटू शकते कारण व्यवस्तीत शिकलेले मुल हि आसा विचार करताना मी स्वत पाहिलं आहे कि रस्त्यावरून जाणारी मुलगी हि आपल्या साठी भोगवस्तू असू शकते ................................................................................................................................... हा विचार करणारा मनुष्य स्त्रीला कधीच समजू शकत नाही आणि नाही तीच स्त्रीत्व ...

Saturday, February 11, 2012

युवी...वि आर मिसिंग यु !!


युवी ..युवराज .. क्रिकेट वर राज करणारा तो युवराज .. भारताचा नायक .. क्रिकेट साठी लढणारा लाढविय्या एकदम अचानक पटागांतून दिसेनासा झाला .. आणि लढू लागला आयुष्याची लढाई ..
खूप वाईट वाटले जेव्हा युवीच्या आजार बद्दल कळले आणि एकदम आठवली ती जाहिरात "जब तक बल्ला है थाट है .. नही तो ?"
जेव्हा पाहिल्यांदा त्याच्या आजार बद्दल पपेर मध्ये कळले तेव्हा कुठे तरी पाल चुक्चुकून गेली कि नक्की काय आहे ..पण काही दिवसातच बातमी आली आणि मन अस्तीर झाल ..
मनुष्याच जीवन इतक नाजूक रेशमी धागा असतो का ? .. कि तो कधी हि विरू लागतो आणि आयुष्याची लढाई चालू करून देतो, हि गोष्ट कोणीच सांगू शकत नाही .. युवी ची बातमी कळल्यावर माझ्या डोळ्या समोर त्याचे सगळे चांगले दिवस एका मागून एक येवून गेले .. त्याची प्रेमप्रकरणे , त्याचे ते एकाच ओवर मधले ६ षटकार .. आणि त्याला मिळालेली वाह वाह .. त्याचे चित्रपट ताराकाबरोबराचे नाच .. त्याच्या सगळ्या जाहिराती आणि मग ... तो विश्व विजेता होण्याचा मान आणि जगलेल ते स्वप्न .. सगळ्यांचच ! जे पूर्ण करण्यामध्ये त्याचा फारच मोलाचा वाटा आहे. विश्वजेत्ते पद मिळाल्या नन्तर त्यांनी व्यक्त केलेला आनंद उत्सव ... शब्द नाहीयेत त्या गोष्टी सांगण्यासाठी .. आणि आपण सगळ्यांनीच ते पाहिलंय आणि अनुभवलाय !
काळ कसा एका शक्नात बदलतो आणि होत्याच नवत करतो .. युवीच्या सगळ्या जाहिराती आता कोणी तरी वेगळे लोक करत आहेत फक्त एकच जाहिरात अजूनही तशीच आहे एका बदला सह .. "जब तक बल्ला है थाट है .. नही तो , जिंदगी भी क्या रंग दिखती है .."
युवी लवकरच छान बर होऊन पटागांत परत येईल आणि त्याच्या त्याच कातील खेळातून पुन्हा आपल्या देशाच नाव पुढे आणील असाच मला मनापासून वाटत आणि मला वाटत असाच सगळ्यांना हि वाटत असेल ..
युवी वि मिस यु !!

Wednesday, January 4, 2012

२०११ ... आयुष्यातील एक सगळ्यात मोठ पर्व ... जे शिकवून गेल बराच काही !!! अलविदा २०११ ...



मला वाटत ह्या जगातला प्रत्येक माणूस नवीन वर्ष चालू होताना एकदा तरी मागील वर्ष कस गेल ह्या बाबतीत नक्कीच विचार करत असेल आणि त्या एका सेकंदाच तो माणूस ते पूर्ण वर्ष फिरून येतो ,प्रत्येकाला स्वताचे चांगले वाईट दिवस दिसून जातात आणि त्यावरच लोक ठरवतात कि मगच वर्ष चांगल गेल कि खराब ..
वाट तशी ठरली होती कुठे जायचं ते हि पक्क होत आयुष्यात कधी दुख असू शकतच नाही हेच फक्त तेव्हा दिसत होत पण अचानकच वादळ आल आणि सगळ काही धुसर झाल आणि वाटच चुकली वाट अशी चुकली कि परत वाटेवर न आणता पूर्वीच्या वाटेवर सोडून गेली, तेव्हा कदाचित हे नवते माहित कि पूर्वीचीच वाट बरोबर होती ..
२०११ वर्षाची सुरुवातच वादळाने झाल्या मुळे पूर्ण वर्ष त्या वादळाच्या पाऊल खुणा काढण्यात गेल्या आस काहीस म्हणायला काहीच हरकत नाहीये, आयुष्यात जे काही कठीण प्रसंग येऊ शकतात ते सगळे हा म्हणजे तसे सगळेच जवळ जवळ येवून गेल्या सारखे वाटले. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांनाच आयुष्यात प्रोब्लेम्स असतात.. हो तर , असतात नं पण प्रत्येकाने आपला एक साचा बनवलेला असतो आणि त्याच्या बाहेर माणूस जास्त करून जाण्याचा प्रयत्न करत नसावा बहुतेक ..
तसाच साचा बनवलेला होता पण ह्या वेळेला साच्यात ठरवलेल्या गोष्टी आल्याच नाहीत, ज्यांच्या वर जास्त विश्वास होता ती लोक विश्वासाच्या चौकडीत बसलीच नाही तिथेच नापास झाली आणि स्वतच जग बानवण्यासाठी दुसऱ्याच बनवलेलं जग निर्दयी पणे तोडून निघून गेली. जीवनात भावना किती महत्त्वाच्या असतात आणि जेव्हा कोणी त्या तोडून मोडून लाथाडून निघून जात तेव्हा त्या इकडे तिकडे विखुरलेल्या भावना एकत्र गोळा करताना काय यातना होतात ते शब्दात सांगूनही कोणाला कळणार नाही. प्रत्येक भावना गोळा करताना मन किती जड होत हि गोष्ट अनुभवण्यासाठी त्याच अनुभवातून जाव लागेल. हे जग किती स्वार्थी असू शकत ते कळल्यावर आपला विश्वास कोणावरच बसू शकत नाही. प्रत्येक माणूस संशयी वाटू लागतो .. अगदी प्रत्येक !
त्यामुळे ह्या वर्षात हे कळल कि पटकन कोणावरही विश्वास ठेवू नये अगदी ती व्यक्ती आपल्या कितीही ओळखीची का होऊ नये, अगदी कितीही.. काही गोष्टी शेऐर करतान हजार काय १० हजार वेळा विचार करा.
आणि प्रत्येक वेळेला स्वताचा विचार करा आपल कस कश्या मुळे जास्त फायदा होईल ते बघा , जग स्वार्थी आहे तर आपण पण काय कमी स्वार्थी आहोत असा प्रश्नच पुढे कधी येतच कामा नये ... हि झाली भावनिक शिकवण जी २०११ वर्षां कडून मिळाली .
मग आली आर्थिक, कितीही छान गुंतवणूक आहे असे वाटल तरी स्वता कडचे सगळे पैसे संपवून त्याच्या मागे पळने मुर्खपणा असतो, पैसे संपतात आणि जेव्हा खरच पैश्याची गरज असते तेव्हा जमीन किवा घर आपल्याला लगेच काहीच पैसे देवू शकत नाही .. गुंतवून करा पण पैसे थोडे बाजूला ठेवून करा कारण जस मी वर सांगितलं, तस कोणीही कितीही जवळच असाल तरी पैश्याची गोष्ट आल्यावर सगळे तू कोण असेच हात वर करतात .. अगदी फालातुतल्या फालतू रकमे साठी सुद्धा ! आणि कधी काळी जरी तुम्ही त्या लोकांना मदत केली असेल तर तो परत आपलाच मुर्ख पणा ...
मग होत कॅरीअर् बद्दलचे झटके, नवीन ऑफिस मध्ये स्वताला सेट कारण हे मला वाटत सगळ्यात अवघड काम असेल आणि जेव्हा तुमच्या कुठल्याच गोष्टी निट होत नाहीयेत हे जेव्हा तुम्हाला माहित असत तेव्हा
बाकीच्या गोष्टीही नक्कीच खराब होतात कारण तुमच मन आणि डोक दोनीही जागेवर नसतात. त्यामुळे जेव्हा तुमच सगळाच पणाला लागल असेल कॅरिअर पणाला लावणे हा एक मोठा मुर्खपणा ठरेल ..
आता साधी आणि सोपी गोष्ट सगळ गणित बिनसल आणि एकदा का गाडी रुळावरून घसरली कि सगळा पडसाद उमटतो घरामध्ये आणि घरातल्या लोकांवर आणि चालू होतात घातरले प्रोब्लेम्स जे सुटत तर नाहीच उलट बिघडतच जातात आणि खर तिथे तुम्हाला गरज असते समजुतीची आणि कोणी तरी समजावून घेण्याची जर कोणी तस केल तरच घरामध्ये जास्त खचण्या आधी आपण वर येतो ...
त्यातच आयुष्यात हे हि शिकले कि तुमच्या कडे सगळ असेल पैसा, हुद्दा , ताकद, सौदर्य आणि व्यक्तीमतत्व पण 1 वेळ तुमला सगळ विसायला लावते अगदी सगळ .. जास्त अभिमान तुम्हाला घेवून बुडतो.
एकंदरीतच, आयुष्याच गणित जर एकदा चुकल तर ते बरोबर उत्तर द्यायला खुप वेळ लागतो आणि बरोबर घेवून जातो पैसा, काळजी, भावना , लोक , वेळ आणि वृत्ती ...
तेव्हा २०११ ने बराच काही हिरावून गेल पण शिकवून गेल लाख मोलाच्या गोष्टी ज्या आता पर्यंतच्या आयुष्यातही शिकल्या गेल्या नवत्या. जुनी लोक बोलतात कि नेहेमी आपल्यावर जेव्हा वाईट प्रसंग येतात ते आपल्याला काहीतरी धडा शिकवून जातात . आज कालची पिढी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसेल पण अश्या गोष्टींवर विश्वास बसण क्रमप्राप्त होत. २०११ वर्ष वाईट नवत ते होत नवीन धडे शिकवणारे वर्ष, जे धडे येणाऱ्या पुढील आयुष्यात नेहेमीच उपयोगी पडतील.
त्यातहि काही लोक सरप्राइस गिफ्ट पेंकेत मध्ये ह्या वर्षात आले आणि थोडा का होईना आपलेपणा आणि समजूतदार पण दाखवून गेले. आणि त्यामुळेच आलेल वादळ आणि त्यामुळे सापडलेली आधीची वाटच अगदी योग्य होती ह्याची पावती देवून गेले.

Friday, October 21, 2011

ईच्छाशक्ती .. The WillPower

काय असते हि नक्की म्हणजे नक्की कुठे असते आणि आहे कि नाही हे कसे ओळखायचे ? खरच खूप प्रश्न पडतात ना ?... पण हि गोष्ट ज्यांच्या जवळ असते ते ह्या जगातले सगळ्यात सुखी आणि श्रीमंत माणस असतात.
कस असा ? प्रश्न पडण स्वभावीकच आहे, हल्ली लोक थोडस काही तरी बिनसलं किंवा काही गोष्टी मनासारखी नाही झाली कि लगेचच डिप्रेस होतात, काहीना वाटू लागत कि संपल आता सगळ आणि तेच ते घोटत बसतात पण इथेच खरी परीक्षा सुरु होते ..
परवा अशीच घरी बसले होते आणि माझ्या काकूंची मैत्रीण आली, दुपारच होती..मी आपली निवांत पुस्तक वाचत झोपले होते त्या आल्या म्हणून उठून बसले,त्यांनी माझ्या कडे बघितलं आणि बोलल्या काय ग तू कधी पासून पुस्तक वाचायला लागलीस? .. मी म्हटलं काही नाही,सध्या वेळच वेळ आहे. ओफीस मध्ये काही काम नाहीये आणि बाकी जे जे तरी करतेय ते पण काय ग्रेट होत नाहीये,वैताग आलाय .. सगळ्या गोष्टी माझ्या बाबतील घडतात,खरच कंटाळा आलाय मला सगळ्याचाच.सगळ माझ्याच बाबतीत बहुतेक देवानी प्लान करून ठेवलाय.
त्यांनी माझ्या कडे पाहिलं आणि मला बोलल्या,तुम्ही आज कालची मुल इतक्या लवकर सगळ्या गोष्टीची कट कट कशी करून घेता, प्रत्येक गोष्टीचा त्रास तुम्हालाच आहे आस का वाटत तुम्हाला ? एवढ्या तरुण वयात लगेच गीवउप कस होता तुम्ही ? अख्खा आयुष्य पुढे उभ आहे आणि तुमच्याकडे कामतरता आहे ती विलपावर ची !
मी त्यांची कडे पाहताच बसले आणि मग मला कळली त्यांनी अनुभवलेली ती ३ वर्षे ...
त्यांना ३ वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता होता, एक असाध्य असा कॅन्सर.. सारकोमा
("http://en.wikipedia.org/wiki/Sarcoma"), हा एक पेशींचा कॅन्सर आहे शरीरातील कोणत्याही भागात हा मसलच्या आत पेशींमध्ये वाढतो. सारकोमा हा २ प्रकारचा असतो एक म्हंजे हाडान्माधला आणि दुसरा मसल मधला.त्यांना पायाच्या पोटरी मध्ये सारकोमा झाला होता.
पुण्यातील प्रत्येक स्पेशालीस्ट डॉक्टर ने त्यांना नाही संगीताल.वयाच्या ३५ ला अश्या प्रकारचा असाध्य रोग होणे हे एक वाईट नशीब नाही तर काय? त्या त्यांच्या भरलेल्या संसाराकडे पाहून त्या मरणयातना सहन करत होत्या. आस समजून कि हे जे काही शेवटचे दिवस आहेत ते तरी आपण आपल्या २ मुल आणि नवऱ्या बरोबर आनंदाने घालावूत. त्यांनी स्वताला घट्ट केल आणि काही न काही तरी पर्यंत करताच राहिल्या. वेगवेगळ्या डॉक्टर कडे जा, कोण कोण ला विचार,नेट वर माहिती मिळवणे तेवढ्यात त्यांना एका मुंबईच्या डॉक्टर चा पत्ता कळला, त्यांनी तिथे जावून दाखवून यायचं नक्की केल आणि त्या गेल्या... तिथे गेल्यावर त्यांना कळल कि त्यांचा कॅन्सर त्यांच्या त्या पायातील फक्त पोटरी पर्यंतच पसरलेला आहे आणि त्याच ऑपरेशन होण शक्य आहे,फक्त त्या ऑपरेशन मध्ये कदाचित पाय कापला जाण्याची शक्यता आहे. त्यांना नवी उमेद मिळाल्याने त्या ते करायला तयार झाल्या.पाय नसेल तरी मी माझ्या संसाराची गाडी नक्कीच कशीही पुढे ढकलू शकेल आस त्यांना वाटून गेल आणि त्यांनी डॉक्टरांना तसा पोसिटीव अतितूड ,विलपावर दाखवली, जी खरी अश्या प्रकारच्या उपचारासाठी आवश्यक असते आणि ते ऑपरेशन व्यवस्तीत पार पडले. सारकोमा फक्त पोटरी मध्ये असल्यामुळे त्यांचा पायाही शाबूत रोहिला फक्त पोटरी शिवाय.
त्यांनची इछाशक्ती जिंकली, त्यांनी मरणाला पण आपल्या इछाशक्ती ने दूर लोटले. आज ३ वर्षानंतरही त्या व्यवस्तीत सगळ करतात. कुठे कुठे फिरायला जातात, स्वताच्या पायावर उभ राहून सगळ करतात अगदी सामान्य माणूस करेल ते ...पण जर त्यानी त्या वेळेला त्यांनी गीवउप केल असत तर ? ..त्यांनी प्रयत्नच केले नसते आणि त्यांना कुठलाच उपाय दिसला नसता. तेव्हा इछाशक्ती हि अशी शक्ती आहे जी तुम्हाला कुठलेही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते. मला त्याचं हे सगळ ऐकून माझी लाज वाटली कि मी किती फालतू गोष्टीसाठी रडतेय.
आयुष्य हे एकदाच मिळत, पुढचा जन्म ..मागचा जन्म आस काहीच नसत. जे करायचं इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. त्यामुळे छान आनंदी राहा. आयुष्य छान जागा , स्वत हसा आणि दुसर्यानाही हसवा. कधीच कोणाला दुखवू नका. आणि सगळ्यात महत्तवाच कुठल्याही गोष्टी साठी "अशक्य" म्हणू नका.

Friday, December 17, 2010

VT support करणारा laptop

हेक्टिक म्हणजे काय ते कळतंय मला आज ... जाम म्हणजे जाम गडबड आणि घोटाळा चाललाय सध्या ...

मला 64 bit OS आणि 4 GB ram आणि VT supoort करणारा laptop हवा आहे आणि मला तो कुठेच मिळत नाहीये ...म्हणजे मिळतोय पण विकत आणि मला विकत नको आहे ...रेंट वर try करतेय मिळतोय का पण ते सगळ तरी करताना आता माझे पेसिओंस संपत आलेत ...

माझा laptop आहे पण तो VT enable नाही आहे ..how bore na? बाकी सगळ configuration match करूनही kahi उपयोग नाही ... how sad !!

कंटाळा आला पण ..सगळ मला एकटीला करताना ..काल पासून मी फक्त ph करतेय कि कुठे मला हे सगळ asalel laptop रेंट वर मिळेल .

आता बहुएत्क शनी मारुतीला जाऊन आले तरच kahi तरी घडेल बहुतेक . ज

Tuesday, November 9, 2010

As you scroll down through your contacts in your mobile ...



As you scroll down through your contacts in your mobile ... each name you see pops up a different stories in your mind ... and you will miss a heartbeat at the special one.. and then you are confused with your feelings .. and maybe then you will see all those memories which were shared with that special person ...and suddenly you find smiling at nothing ....

You realized that you were cherishing all good moments with each one of them and then without a second thought you were ending up the list of persons in the contact list ...

But 20 yrs from now - Is it gonna be the same??? Will you at least give a missed call for the ones that were once your dearest and nearest ... and that one special person, what you will think that time ? will you remember those memories again ??

You will feel distance that you were unaware of and you wish you were closer that time or maybe there was a chance where you could change your life with that special one !!!

I wonder, if anyone or anything from the world can stop crying you then !!! strange.. but very true .. !!

So ... don't think that you have missed the bus ... think that there is still some hopes that you will get your things or may be your life back ....!!!

Wednesday, December 2, 2009

Speech by Chetan Bhagat at Symbiosis ...

Don’t just have career or academic goals. Set goals to give you a balanced, successful life. I use the word balanced before successful. Balanced means ensuring your health, relationships, mental peace are all in good order.

There is no point of getting a promotion on the day of your breakup. There is no fun in driving a car if your back hurts. Shopping is not enjoyable if your mind is full of tensions.

"Life is one of those races in nursery school where you have to run with a marble in a spoon kept in your mouth. If the marble falls, there is no point coming first. Same is with life where health and relationships are the marble. Your striving is only worth it if there is harmony in your life. Else, you may achieve the success, but this spark, this feeling of being excited and alive, will start to die. ……………….

One thing about nurturing the spark - don't take life seriously. Life is not meant to be taken seriously, as we are really temporary here. We are like a pre-paid card with limited validity. If we are lucky, we may last another 50 years. And 50 years is just 2,500 weekends. Do we really need to get so worked up? …………….

It's ok, bunk a few classes, scoring low in couple of papers, goof up a few interviews, take leave from work, fall in love, little fights with your spouse. We are people, not programmed devices........." :)


"Don't be serious, be sincere."!!

Thursday, July 30, 2009

स्वार्थ

लोक खरच का स्वार्थी असतात ,अगदी जे आपल्या जवळचे वाटतात?

हल्ली कोणीही कसाही वगल तरी मनाच्या कोपर्‍यात एक प्रशचिन्ह येत

ह्यात तर काही स्वार्थ नसेल ना ?

कारण आपण तर सगळ च देऊन बसू आपल्या न काळात …

पण त्याच महत्त्वा ती ठेवेल का आपल्याला जपत ?

खरच प्रेम आणि स्वार्थ कधी एकत्र येऊ शकतात

माझ मन तर मनात नाही , पण काय सांगाव खार कोणी बोलत नाही.

आयुष्याच्या ह्या उंबरठ्यावर हा प्रश्न , खर तर एक कोड आहे ..

पण मी म्हणते लोक आस वागतात, म्हणूनच प्रश्न पडतात.

Thursday, July 23, 2009

rickshaw - MH-02-Z-8508

Suvendu Roy of Titan Industries shares his inspirational encounter with a rickshaw driver in Mumbai.

Last Sunday, my wife, kid and I had to travel to Andheri from Bandra. When I waved at a passing auto rickshaw, little did I expect that this ride would be any different. As we set off, my eyes fell on a few magazines (kept in an aircraft style pouch) behind the driver's back rest. I looked in front and there was a small TV. The driver had put on the Doordarshan channel. My wife and I looked at each other with disbelief and amusement. In front of me was a small first-aid box with cotton, dettol and some medicines. This was enough for me to realise that I was in a special vehicle. Then I looked around again, and discovered more -there was a radio, fire extinguisher, wall clock, calendar, and pictures and symbols of all faiths - from Islam and Christianity to Buddhism, Hinduism and Sikhism. There were also pictures of the heroes of 26/11- Kamte, Salaskar, Karkare and Unnikrishnan. I realised that not only my vehicle, but also my driver was special. I started chatting with him and the initial sense of ridicule and disbelief gradually diminished. I gathered that he had been driving an auto rickshaw for the past 8-9 years; he had lost his job when his employer's plastic company was shut down. He had two school-going children, and he drove from 8 in the morning till 10 at night. No break unless he was unwell. "Sahab, ghar mein baith ke TV dekh kar kya faida? Do paisa income karega toh future mein kaam aayega." (Sir, what's the use of simply sitting at home and watching TV? If I earn some income, then it will be useful in the future.) We realised that we had come across a man who represents Mumbai - the spirit of work, the spirit of travel and the spirit of excelling in life. I asked him whether he does anything else as I figured that he did not have too much spare time. He said that he goes to an old age home for women in Andheri once a week or whenever he has some extra income, where he donates tooth brushes, toothpastes, soap, hair oil, and other items of daily use. He pointed out to a painted message below the meter that read: "25 per cent discount on metered fare for the handicapped. Free rides for blind passengers up to Rs50?. He also said that his auto was mentioned on Radio Mirchi twice by the station RJs. The Marathi press in Mumbai know about him and have written a few pieces on him and his vehicle. My wife and I were struck with awe. The man was a HERO! A hero who deserves all our respect. I know that my son, once he grows up, will realise that we have met a genuine hero. He has put questions to me such as why should we help other people? I will try to keep this incident alive in his memory. Our journey came to an end; 45 minutes of a lesson in humility, selflessness and of a hero-worshipping Mumbai - my temporary home. We disembarked, and all I could do was to pay him a tip that would hardly cover a free ride for a blind man.

Some Pictures:

25% discount for handicapped !! who on this earth can expect somethin like this from an rickshawala yaar!!
He has got a tv on the top with cable (I was watching colors channel) and below tat is the tissue box. on the left is the mandir types and dont miss the "Only gandhigiri" written there , below tat is the calender and a notepad and pen along with a blue fan (which is blowing towards the customer who sits)

He has got a first aid box on the left and a newspaper box on right (which had all hindi-english- marathi-gujrati and economic times)
Its amazing there are ppl still alive like him in this world!
I hope, one day, you too have a chance to meet Mr Sandeep Bachhe in his auto rickshaw
- MH-02-Z-8508






Thursday, July 2, 2009

वॉलड्रॉप

बर्‍याच दिवसात काही लिहायला वेळ नाही मिळाला … आज जरा वर्कलोड कमी आहे म्हणौन म्हटल जरा ब्लॉग वर जाव …

सध्या सगळी कडे कोस्ट कट्टिंग्स चालू आहे … आमच्या ऑफीस मधे ही तेच चालू आहे … मग सगळ पाहून विचार येतो आररे आपण पण जरा खर्चावर लगाम घातला पाहिजे… पण हे जमाला पाहिजे ना… सगळ्यात पाहील म्हणजे मला हेच काळात नाही की खर्चावर लगाम लावंन म्हणजे नक्की काय करण?
आता साढ उदाहरण म्हणजे … मला (मूलीना) कितीही ड्रेस आसले तरी ते कमी आहेत आस वाटत … आता ऑफीस मधे जाताना चांगले कपडे नकोत का …मुली किती छान छान कपडे घालून येतात मग … आता आला का इथे खर्च … तुम्ही बोलल कस बर ? … अगदी सोप आहे आता छान छान ड्रेस रोज घालायचे महणजे तास तुमच वॉलड्रॉप नेहेमी अपडेटेड आसल पाहिजे … आणि नसेल तर ते करण्या साठी खर्च तर करावाच लागणार …

आता मज़ तर रोजच आहे की जेव्हा पण ऑफीस ला जायची वेळ जवळ येते आणि मी तयारी करायला सुरूवात करते … सगळ्यात पहिले माज़या समोर एकच प्रश् येतो की आज कोणता ड्रेस घालायचा ? मग कपात उघडायाच आणि सगळ्या ड्रेसस वरुन नजर फिरवत विचार करायचा … आरे हा घालू की तो घालू … मग एखादा फिक्स ज़ला की …मग आरे हा तर मागच्याच आठवड्यात घातला होता … नको हा नको …आणि आस करत करत … कुठलाच फाइनल होत नाही … आणि मग विचार येतो "चे , आपल्या कडे तर छान ड्रेससच नाहीयेत … वॉलड्रॉप चेंज करणे फारच महत्त्वच ज़ाल आहे …

मग आला की नाही खर्च .. ?

Tuesday, May 5, 2009

स्त्री ...

स्त्री ... किती छान आणि आदरपूर्ण शब्द आहे हा... पण खरच का सगळे जण ह्याशब्दचा आदर ठेवतात? मला वाटत , नाही ठेवत... काही जण ह्या शब्दाला मारण्याचा प्रायन्त करतात तर काही जण स्त्रीच्या अस्तित्वाला ला संपवण्याचा प्रयन्त करतात,तिला शारीरिक मारहाण करतात ..काही तर मानतात की स्त्रीला तर अस्तित्वच नसत.खरच का स्त्रीला अस्तित्वा नसत. ... आररे पण हे का विसरतात की त्याच स्त्री मुळे तर ते लोक ह्या जगात वावरत असतात.पण हे कधीच काळत नाही ह्या लोकाना ... त्याना स्त्री फॅक्ट एक साधन असत त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्या साठी ... सकाळी उठल्या पासून ते अगदी zओपे पर्यंत ...एक साधन...जे सगळ्या गरजा पूर्ण करतच असतात काही न बोलता.... अगदी मुकुटपणे...सकाळी उठल्यावर ते ज़ोपे पर्यंत फॅक्ट काम करत रहण ..हेच तीच जीवन असत...पण एवढ करून तिला काय मिळत ... दोन प्रेमाचे शब्द पण नाही ... मिळतात ते फ़क्त शिव्या आणि शाप ... आणि वासनेने भरलेली जवळीक ... जी तिच्या मना सारखी कधीच नसते ... ती फक्त एक साधन असते...आणि एवढ करूनही तिला चांगल कोणीच बोलत नाही...आस का होत ... का स्त्रीला अजूनही लोक जोड्या जवळ ठेवचा प्रयत्न करतात. का ...? तिच्या ह्या जगण्याळा कोण जावाबदर ... आहे? ... ती स्वता: की अजुन दुसर कोणी?

Sunday, April 12, 2009

आपल कोण ?

आता जे काही तुम्ही वाचा ल ते वेगळ काही नाहीए , मला वाटत सगलयानी ते पहिले असेल.... हा एक चित्रपटा तील भाग आहे ..पण कधी कधी विचार करायला लावतो ...
आग गाडी थांबते आणि एक छान साडी नेसलेली मुलगी खाली उतरते, ती एका वाड्या पाशी येते ..आणि पाहून थक्क होते तिचा प्रीयकार तिला दिसतो पण तो नेहेमी सारखा नसतो पूर्ण पणे बदलेला ... दिसन्यने ...वागण्या ने ... आणि मग तिला अचानक सत्य समोर दिसते ...त्याची बायको.. आणि तिला उलगदत त्याच्या बदललेल्या चेहेरयाच रहस्य... ती खूप आक्रोश करते ...ओरडते, त्याला मारातेही..पण ते सगळ करून काहीच बदल होणार नसतो...समोर फक्त एकच सत्य असत..तिच्या प्रीयकरच zअलेल लग्न...त्या प्रीयकरच ज्याने आता पर्यंत फक्त तिच्या वर जिवापाड प्रेम केलेल असत..ज्याच ती सर्वस्व असते. पण आता काय? काय कारव तिने? सोडून द्याव... की तेच धरून बसाव. काय मानसिकता ज़ाली असेल तिची...कस सहन करू शकते एक वेगळी वॅक्टी .... जी तिच्या प्रीयकरच्या आयुष्याचा अविभज्य भाग बनलेय..... हे पाहाताना आपण पटकन हे पाहून जोतो आणि विसरून जातो पण...खरच ज्या मुलीच्या आयुष्यात हे कधी घडल असेल...तिने हे कस आयुष्यात सामावून घेतल असेल ... फारच अवघड आहे हे सगळ...कधी तरी स्वतळाच विचारून पहा हा प्रश्न की तुम्ही काय कराल.. जर कधी ही वेळ तुमच्या वर आली ...

चित्रपट : विरासत (अनिल कपूर,तब्बू,पूजा बतारा)

Wednesday, January 7, 2009

एक अनुभव - रिक्षा

एक अनुभव तुमच्याशी शेयर करावासा वाटतोय .... आज मला ऑफीस ला रीक्षेने जायला लागले तस माज़ ऑफीस माज़या घरपासून खूपच लांब अहे.. मी माज़या घरच्या खाली आले रिक्षा स्टॅंड वर एकच रिक्षा उभी होती मनात विचार आला "आता ही रिक्षा येणार का माज़या ऑफीस कडे की नाही बोलेल..." मी रिक्ष्याच्या जवळ गेले एक धिप्पद सावळा माणूस, वयाने ४५ चा असेल,अंगात पांढरा ज़ब्बा आणि लेंगा आणि डोक्यावर पांढरी नेहेरू टोपी एकदम मराठी माणूस मी डोकवून बोलले "मगारपट्टा येणार का? "आणि त्यानी होकारर्थी मान हलवली आणि रिक्षा चालू केली... त्याच्या चेहेर्यावर आनंदाचे भाव दिसले कारण त्याला छान लामच भा डा मिळाल. पण आता पर्यंत नेहेमी जेव्हा मला ऑफीस ला रिक्षने जाव लागलाय तेव्हा मगारपट्टा एइकूण सगळ्यानी मला 20 रुपये जास्त होतील असाच उत्तर दिलय... पण आज जेव्हा हा माणूस मला काहीच बोलला नाही तेव्हाच मला आचर्य वाटल.. रिक्षा सुरू ज़ाली आणि अर्ध्या पावू न तासाने आम्ही मगारपटा मधे पोचलो... मीटर पाहून मला आचर्य वाटल की इतके कमी पैसे कसे ज़ले?...मी त्याना सांगितले "10.80 चे किती ..." त्याने टर्रिफ कार्ड काढले आणि बोलले ..."85" मी एकदम दचकले आणि बोलले "काय 85 ? कस शक्या आहे...हे तर फारच कमी अहेत...तुमच मीटर मधे काही तरी प्रॉब्लेम आहे बहुतेक..." पण मीटर तर चालत होत...ते एकदम गडबदले आणि बोलले "आता मी काय सांगू तुम्हीच सांगा किती घ्यायचे ते..." मग मी त्या सांगितले..."हे बघा इथून स्वॉरगेट पर्यंत 110 रुपये होतात ...आता बोला किती देऊ..."ते हसले आणि बोलले "140 द्या मॅडम..." मी त्याना त्यांचे 140 रुपये दिले कारण ते खरच त्यांचे होते... ते हसले आणि बोलले "सुखी राहा..."

Thursday, August 28, 2008

Life is Priceless

Image Courtesy: http://www.sodahead.com/

Every life on this earth is doing every small thing to struggle for life. Why we always say our life is Priceless?
Spiritually, When anyone take birth on this earth he is coming through a very long jorney.He have to complete 84 births of each and every creature available on this earth means, if today you are taking birth as a human being then it is coming after 84 births. Isn’t it amazing...?
So if we are getting such a wonderful precious life after so many birth then I think our life is really very very priceless.
Any alive thing can feel, can do anything than any lifeless thing. As we are human, we can do each and every thing that is available on this earth.
So we should take our life very positively and achieve targets rather than just giving up for failure. I don’t understand why people use their so precious lives for human bomb and just destroy it, why they don’t understand the value of their lives, why people suicide themselves? Everybody should take life positively, and get the most out of it. They will not get 100% of their life but will defiantly get 30% rather than just ending their priceless and precious lives.